रेल्वे गाड्या वेळेत धावतील तरी केव्हा?
तीन महिन्यांपासून चित्र कायम : प्रवाशांना होतोय मनस्ताप; सणासुदीच्या दिवसात फटका
गोंदिया : मागील तीन महिन्यांपासून हावडा-मुंबई मार्गावरील रेल्वे मार्गावरील रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक बिघडले आहे. त्यामुळे प्रवाशांना...
more... त्यांच्या नियोजित ठिकाणी पोहोचण्यास अडचण होत असून मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यातच सणासुदीच्या कालावधीत काही प्रवासी गाड्या रद्द केल्याने प्रवाशांच्या समस्येत आणखी भर पडली आहे.
कोरोना कालावधीत रेल्वेला
सर्वाधिक महसूल हा मालगाड्यांच्या वाहतुकीतून मिळाला. त्यामुळे रेल्वेने मालगाड्यांना कोरोना काळात दिलेले प्राधान्य अद्यापही कायम ठेवले आहे. त्यामुळे प्रवासी गाड्यांना थांबवून मालगाड्या सोडल्या जात आहेत. त्यामुळे मागील तीन महिन्यांपासून रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक बिघडले आहे. गोंदिया रेल्वे स्थानकाच्या आऊटरवर दोन दोन तास गाड्या थांबवून ठेवल्या जात आहेत.
त्यामुळे प्रवाशांना याचा मानसिक त्रास सहन करावा लागत असून त्यांना त्यांच्या नियोजित ठिकाणी पोहोचण्यास अडचण निर्माण होत आहे. आझाद हिंद एक्स्प्रेस हावडा- अहमदाबाद, साईनगर शिर्डी, छत्तीसगड एक्स्प्रेस, विदर्भ एक्स्प्रेस, शालीमार या गाड्या मागील तीन महिन्यांपासून विलंबाने धावत आहेत. या गाड्यांचे वेळापत्रक केव्हा रुळावर येणार, असा सवाल प्रवाशांकडून केला जात आहे. पण रेल्वेचे अधिकारी रेल्वे बोर्डाकडे बोट दाखवून मोकळे होत आहेत. त्यामुळे रेल्वे प्रवाशांची समस्या कायम आहे.
विदर्भ एक्स्प्रेसचा प्रवाशांना आला वैताग
विदर्भ एक्स्प्रेस ही नागपूरवरुन गोंदियासाठी वेळेत सुटते, मात्र गोंदिया रेल्वे स्थानकापासून दोन तीन किमी अंतरावर ही गाडी एक ते दीड तास थांबवून ठेवली जाते. ही समस्या इतर गाड्यांचीसुद्धा आहे. हा प्रकार मागील दोन महिन्यांपासून असल्याने प्रवाशांना विदर्भ एक्स्प्रेसचा वैताग आल्याचे चित्र आहे.
महाराष्ट्र, आझाद हिंद एक्स्प्रेस केली रद्द
सध्या सणासुदीचे दिवस असून बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्ये वाढ झाली आहे, त्यामुळे रेल्वे गाड्यांची संख्या वाढविण्याच असताना रेल्वे याच कालावधीत जिल्ह्यातील प्रवाशांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या महाराष्ट्र एक्स्प्रेस, आझाद हिंद एक्स्प्रेस, बिलासपूर एक्स्प्रेस गाड्या रद्द केल्या आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना बसने प्रवास करावा लागत असून आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
या गाड्यांचे वेळापत्रक सुधारेना
मागील तीन महिन्यांपासून सिकंद राबाद, आझाद हिंद एक्स्प्रेस, हावडा- अहमदाबाद, साईनगर शिर्डी, छत्तीसगड एक्स्प्रेस, इंटरसिटी, टाटानगर या गाड्या तीन-चार तास उशिराने धावत आहेत. या गाड्यांचे वेळापत्रक अद्यापही सुधारले नसल्याने प्रवाशांची समस्या कायम आहे.
मालगाड्या नव्हे प्रवासी गाड्यांना प्राधान्य द्या
रेल्वे विभागाने कोरोना काळात अवलंबलेले • धोरण बदलून मालगाड्यांना नव्हे तर प्रवासी गाड्यांना प्राधान्य देण्याची गरज आहे. तर रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक सुधारेल अन्यथा यात सुधारणा होणे शक्य नाही.